*नांदेड/प्रतिनिधी*
महाराष्ट्र आणि आंध्रा , तेलंगाना सीमा लागत असलेल्या बिलोली या तालुक्याच्या ठिकाणावर डाक विभागाचे स्वतंत्र डाक भवन उभारण्यात यावे अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांच्याकडे केली आहे. खा. डॉ. गोपछडे यांनी आज दिल्लीत केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
नांदेड जिल्ह्यातील सर्वात जुना आणि निजाम कालीन तालुका म्हणून बिलोली तालुक्याची ओळख आहे. बिलोली तालुका हा तेलंगणा, आंध्रा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला अत्यंत जुना तालुका आहे. या ठिकाणी तहसील कार्यालय , उपविभागीय कार्यालय , उपजिल्हा रुग्णालय , तालुका न्यायालय अशी अनेक महत्त्वाची शासकीय आणि प्रशासकीय कार्यालय आहेत परंतु येथे डाक विभागाचे स्वतंत्र भवन नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत.
या सर्व अडचणी लक्षात घेता केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन बिलोली येथे स्वतंत्र डाक भवन उभारण्यासाठी मंजुरी द्यावी अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केली आहे. या अनुषंगाने बोलताना खा. डॉ. अजित गोपछडे म्हणाले की , बिलोली तालुका हा नांदेड जिल्ह्यातील सर्वात जुना तालुका आहे परंतु काही लोकांच्या चुकीच्या राजकारणामुळे या तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊ शकला नाही. आता केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्यामुळे निश्चितपणे बिलोली तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने अनेक प्रकल्प येथे राबून बिलोली तालुक्याचा कायापालट करण्याचा करण्यात येईल. याच अनुषंगाने बिलोली येथे स्वतंत्र डाक भवन उभारावे यासाठी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्यामुळे बिलोली येथे लवकरच डाक घेऊन उभारण्याचे अनुषंगाने सकारात्मक कारवाई होईल असा विश्वास आहे . खा.डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला.
